माझी पहिलीच वेळ. मोठ्या बहिणीची झाली तेव्हा पाहीली होती. मग परत एकदा प्रश्न पडायला सुरुवात झाली.....
मला आई-बाबा,ताई फोन वरुन माहिती, पूजेचा विधी सांगत होते. त्याप्रमाणे तयारी चालू केली. अहोंना सोबत घेऊन पूजेच सामान आणून ती उत्तम रितीने पार पाडली, ती अशी.....
चौरंगावर गौर बसवली, तिला तांदूळ-मुगाची डाळ वाहिली, समोर वाळूची महादेवाची पिंड स्थापन केली, त्यावर वेगवेगळी पत्री वाहिली, भोवताली फुलं-पानं,रांगोळी यांची आरास केली.सोळा वाती लावुन पुरणाची आरती केली, नंतर कहाणी वाचली. मुक्याने जेवण केले.
पण अजूनही काही प्रश्न आहेत....आणि उत्तर हवी आहेत ती तुम्हा जाणकारां कडून.....
१. ही पुजा कोणी करायची?
२. किती वर्ष करायची?
३. तांदूळ-मुगाची डाळ का वाहतात?
४. मुक्याने का जेवतात?
५. मंगळागौर जागवणं म्हणजे काय?का जागवतात?
यापुढची पुजा करताना यापैकी एकही प्रश्न मनात नसेल याची खात्री आहे, कारण ती उत्तरं मला मिळतील...तीपण तुमच्या कडून.....
http://www.maayboli.com/node/2920 इथे जावे. ब-यापैकी माहीती मिळेळ
ReplyDelete