Monday, August 16, 2010

श्रावण - नारळीपौर्णिमा / राखी पौर्णिमा / श्रावणी पौर्णिमा

`पातळातल्या बळीराजाच्या हाताला लक्ष्मीने राखी बांधून त्याला आपले भाऊ केले व नारायणाची मुक्‍तता केली. तो दिवस श्रावणपौर्णिमा होता.' म्हणून या दिवशी राखी पौर्णिमा साजरी केली जाते. ही पद्धत विशेषकरुन उत्तर हिंदुस्थानात आहे. बहिण भावाला राखी बांधते व भाऊ बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो.

समुद्रकिनारा असलेल्या भागांमध्ये विशेषत: कोळी समाजात या दिवशी समुद्राची पूजा करतात व त्यात नारळ सोडतात. नुकताच पावसाळा संपलेला असतो, झालेली मासेमारी जशी चांगली झाली तशीच ती पुढे चालु राहू देत. अशी प्रार्थना करतात व नारळ सोडून कृतज्ञता व्यक्त करतात, म्हणून या दिवसाला नारळीपौर्णिमा असेही म्हणतात.
यादिवशी पक्वान्न म्हणून नारळाचे विविध गोड पदार्थ करतात.

1 comment:

  1. Hi Akansha, khup chan watal rakshapornimebaddal wachun(te pan marathit!)

    ReplyDelete